शनिवार, ६ डिसेंबर, २०१४

आईची एक प्रेमळ कथा......नक्कीच डोळ्यात पाणी येईल.

आईची एक प्रेमळ कथा......
नक्कीच डोळ्यात पाणी येईल.
एका गावात एक बाई
आपल्या छोट्या मुलाबरोबर
एका छोट्या झोपडीत राहात होती.
आपल्या मुलाला काही कमी पडू नयेम्हणून
दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण
त्या छोट्या मुलाला मात्र, आपली आई अजिबात
आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो;
कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत
असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो.
एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे
लागते; पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे
मुलाला कळत नाही.... रागाचा एककटाक्ष टाकून
तो तिथून पळून जातो. घरी आल्यावर
तो आईला प्रचंड बोलतो.""कशाला आलीहोतीस
शाळेत? आता माझे मित्र मला चिडवतील?
मी उद्या शाळेत कसा जाऊ? तुला एक
डोळा का नाही? मलातू अजिबात आवडत
नाहीस.'' वगैरे वगैरे. आई काहीही बोलत नाही.
आपण आईला खूप बोललो, याचे
मुलालाही काही वाटत नाही. रागाने
तो नुसता धुमसत असतो. आईशी काहीही न
बोलता जेवतो आणि झोपतो.
रात्री कधीतरी त्याला जाग येते; तर
आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये
अशा दबक्या आवाजात त्याची आईरडत असते. पण
त्याचेही त्याला काही वाटत नाही.
एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच
तिरस्कार वाटायला लागतो.
त्या क्षणी तो निर्णय घेतो, शिकून खूपमोठे
व्हायचे आणि इथूनबाहेर पडायचे.
त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो. उच्च
शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो.नामवंत
विद्यापीठातून पदवी मिळवतो. मोठ्या कंपनीत
मोठ्या हुद्द्यावर काम करू लागतो. एका सुंदर
मुलीशी त्याचे लग्न होते. त्याला एक मुलगा, एक
मुलगी होते. आता त्याचे कुटुंब पूर्ण होते; कारण हे
सुंदर चित्र
बिघडवणारी एका डोळ्याची
त्याची आई तिथे
नसते. तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो.
अतिशय सुखात असतो.
एक दिवस त्याच्याघराचे दार वाजते. दारात
एका माणसाबरोबर त्याची तीच
एका डोळ्याची आई उभी असते. तिला बघून
त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते.
तोआधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत
तिला म्हणतो,""कोण आहेस तू? इथे का आलीस?
बघ माझी मुलगी तुला घाबरली.''
""मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले,'' असे
काहीसे पुटपुटत आई निघून जाते. तिने
आपल्याला ओळखले नाही, अशा समाधानात (?)
मुलगा दार लावून घेतो.
काही दिवसांनी,
माजी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून
पत्र येते. परत त्या गावात जाऊ नये असे वाटत
असतानाही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय
घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय, असे
बायकोला खोटेच सांगतो.
संमेलन पार पडते. कुठल्यातरी अनामिक ओढीने
त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे
वळतात. दाराला कुलूप असते. शेजारची बाई
त्याला ओळखते आणि
एक पत्र देते. ते पत्र
त्याच्या आईचे असते.
तो वाचू लागतो,
मी खूप आयुष्य जगले.
तुझ्याकडे आता मी परत
कधीही येणार नाही; पण तू कधीतरी येऊन
मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे.
शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले होते; पण
तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे
मी नक्की ठरवले. कारण मला माहिती आहे,
एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही.
मला एकच डोळा का, असेही तू
मला एकदा विचारलेहोतेस. तेव्हा तू खूपच लहान
होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही; पण
आज सांगते. बाळा, तू लहान असताना एक अपघात
झाला. त्या अपघातात तू तुझा एक
डोळा गमावलास. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य
कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले
आणि माझा एक डोळा तुला दिला. मला तुझा खूप
अभिमान आहे. तू मला जे बोललास
किंवा माझ्याशी जसा वागलास
त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावलेले
नाही."तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे,' असाच
विचार मी करते.
कधी काळी माझ्या भोवतीभोवती खेळणारा तू
मला नेहमी आठवतोस...''
पत्र वाचून मुलगाढसढसा रडू लागला..
जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली,
स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिनं
त्याला सहजपणे देऊन टाकला, तिच्याशी आपण
किती निर्दयपणे वागलो. त्याला प्रचंड
पश्चात्ताप झाला,तो आईला मोठमोठ्याने
हाका मारू लागला;पण आता त्याचा काय उपयोग
होता??
मित्रानो आई-वडिलांसाठी
कोणतीही गोष्ट
सोडा.
पण..
कोणत्याही गोष्टीसाठी
आई-वडिलांना सोडू
नका. . .

सोमवार, १ डिसेंबर, २०१४

चांगलीच विचारधारा

चांगलीच विचारधारा
जिंकण म्हणजे काय ते हरल्याशिवाय कळत नाही. .......
दुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही.........
सुख म्हणजे काय ते दुस-याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही......
समाधान म्हणजे काय ते आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही.......
मैत्री म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही.......
आपली माणस कोण ते संकटांशिवाय कळत नाही ........
सत्य म्हणजे काय ते डोळे उघडल्याशिवाय कळत नाही.......
उत्तर म्हणजे काय ते प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही......
जबाबदा-या म्हणजे काय हे त्या सांभाळल्या शिवाय कळत नाही....
काळ म्हणजे काय हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही.......
मृत्यू म्हणजे काय हे तो समोर आल्याशिवाय कळत नाही......
चालणारे दोन्ही पाय किती विसंगत, एक मागे, एक पुढे असतो, पुढच्याला अभिमान नसतो, मागल्याला अपमान नसतो, कारण त्याना ठाऊक असत क्षणात हे बदलणार असत, ह्याच नाव "जीवन" आहे.


माउली नंतर समाधी नाही ||
तुकोबा नंतर वैकुंठ गमन नाही ||
शिवराया नंतर छत्रपती नाही||
गंधर्वा नंतर गाणं नाही |
माशा नंतर पोहण नाही |
रामानंतर आचरण नाही |
रावणानंतर श्रीमंती नाही |
गरुडानंतर भरारी नाही |
मेघा नंतर उदारता नाही |
कर्णा नंतर औदार्य नाही |
साधु नंतर कृपा नाही |
देवा नंतर आशिर्वाद नाही |
आई नंतर प्रेम नाही |
मृत्यू नंतर भय नाही |
नर (मनुष्य) देहा नंतर पुन्हा देह नाही |
आणि......
जीवन जगताना हे मी कधीच विसरत नाही,
म्हणून चांगल वागता आलं नाही तरी चालेल पण;
जाणीवपूर्वक वाईट कधीच वागत नाही ||

तुकाराम महाराज म्हणतात

तुकाराम महाराज म्हणतात
गाढवाच्या अंगाला चंदनाची उटी लावली तरी राखेत लोळून
तो ती सर्व पुसून टाकतो, तसेच माकडाच्या गळ्यात जर
मोत्याचा हार घातला तर तो ते चावून, त्याची विलेवाट लावून
थुंकून टाकतो. ते म्हणतात ज्याच्या अंगी जे स्वाभाविक गुण
असतात म्हणजेच ज्याचा जो स्वभाव असतो त्यात बदल
घडवून आणणे अशक्य असते, तो ते गुण सोडू शकत
नाही किंवा त्यात बदल करत नाही.
तुकोबाराय म्हणतात मूर्ख, अडाणी माणसाला हितकारक
सल्ला किंवा उपदेश रुचत नाही, ते तो झिडकारून
लावतो आणि त्यात स्वतःची मते घालून व त्यानुसार वागून
स्वतःच्या अज्ञानात अजून भर घालतो.
===================================
गाढवाचे अंगी चंदनाची उटी । राखेसवे भेटी केली तेणे ।।
सहज गुण जयाचिये देही । पालट ते (तो) काही नव्हे तया ।।
माकडाचे गळा मोलाचा तो मणि ।
घातला चावुनि थुंकोनि टाकी ।।
तुका म्हणे खळा नावडे हित । अविद्या वाढवीत आपुले मते ।।
===================================

एक छान गोष्ट



एक छान गोष्ट
एक दहावीत असलेला मुलगा मधल्या सुट्टीत डबा खात असतो त्याचे मित्र पण डबा खात असतात. सर्वांचा डबा खाऊन होतो पण तो मुलगा डबा अगदी चाटून पुसून खात असतो सगळे जण त्याची चेष्टा करतात.
त्यांतला एक त्याला विचारतो एवढं का चाटून पुसून खात आहेस? मुलगा शांतपणे उत्तर देतो.
हे माझं असं अन्नाचा प्रत्येक कणं पुसून खाणं हे मी माझ्या आई बद्दल व्यक्त केलेला आदर आहे की जी सकाळी लवकर उठून माझ्यासाठी आवडीने बनवते आणी तेही दररोज, तसेच हा आदर त्या बाबांसाठी ही आहे ते दिवसरात्र मेहनत करून त्या अन्ना साठी लागणारा पैसा कमावतात.
आपण अन्नाची केलेली नासाडी हा आई बाबांच्या मेहनतीचा अपमान तर आहेच पण त्याही पेक्षा जास्त तो त्या शेतकरी बांधवाचा आहे जो ते दिवसरात्र खपून पिकवतो.
स्वत: अंमलबजावणी करा कुणाला पाठवले नाही तरी चालेल.

रविवार, २३ नोव्हेंबर, २०१४

मूर्ख, अडाणी माणसाला हितकारक सल्ला किंवा उपदेश रुचत नाही

 
 
 
तुकाराम महाराज म्हणतात
गाढवाच्या अंगाला चंदनाची उटी लावली तरी राखेत लोळून
तो ती सर्व पुसून टाकतो, तसेच माकडाच्या गळ्यात जर
मोत्याचा हार घातला तर तो ते चावून, त्याची विलेवाट लावून
थुंकून टाकतो. ते म्हणतात ज्याच्या अंगी जे स्वाभाविक गुण
असतात म्हणजेच ज्याचा जो स्वभाव असतो त्यात बदल
घडवून आणणे अशक्य असते, तो ते गुण सोडू शकत
नाही किंवा त्यात बदल करत नाही.
तुकोबाराय म्हणतात मूर्ख, अडाणी माणसाला हितकारक
सल्ला किंवा उपदेश रुचत नाही, ते तो झिडकारून
लावतो आणि त्यात स्वतःची मते घालून व त्यानुसार वागून
स्वतःच्या अज्ञानात अजून भर घालतो.
===================================
गाढवाचे अंगी चंदनाची उटी । राखेसवे भेटी केली तेणे ।।
सहज गुण जयाचिये देही । पालट ते (तो) काही नव्हे तया ।।
माकडाचे गळा मोलाचा तो मणि ।
घातला चावुनि थुंकोनि टाकी ।।
तुका म्हणे खळा नावडे हित । अविद्या वाढवीत आपुले मते ।।
===================================

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०१४

केलें म्हणजे होतं.

केलें म्हणजे होतं

एक व्यवसायाने वकिल पेशा करणारे जोडप
होत.दोघेही कोर्टातून घरी आल्यानंतर तो म्हणायचा आज
अशी केस जिंकली,तसी केस जिंकली,आज असं झाल, तसं
झालं. परंतु ती म्हणायची,त्यात काय मोठं केलं म्हणजे होंत
आणि रोज रोज अस चालल्यानंतर तो मोठया फुशारकीने
सांगायचा आणि ती म्हणायची, त्यात काय मोठं केल म्हणजे
होंत परंतु त्यामुळे त्याला खुप राग आला व त्याच
टोकाची भांडणे होऊन दोघेही वकील असल्यामुळे वगेच
फारकत घेवून मोकळे झाले. मग साहेब मुंबईला तर बाईसाहेब
नागपूरला. नागपूर येथे एक सर्कस आली होती व
त्या सर्कसीमध्ये एक वकील महीला सल्लागार
हवी होती.बाईसाहेबांनी जाहीरात वाचली व
त्या ठिकाणी सर्कसमध्ये रजू झाल्या.त्या सर्कसमध्ये एक
हत्तीन व्याली होती.बाईसाहेबानी ते एक दिवसाचे पिल्लू
उचलून खांद्यावर घेतल.अशा रीतेने रोज
सकाळ,दुपार,संध्याकाळ ते पिल्लू ती उचलू लागली.ते
पिल्ल्ूा दोन वर्षाचे मोठे झाले.काही दिवसांनी ती सर्कस मुंबई
येथे आली,पोस्टर झळकू लागली की, बाई हत्ती उचलते
आणि हे पोस्टर वकील साहेबाने पाहीले.त्याला आश्चर्य
वाटले मुद्याम फर्स्ट क्लासचं तिकीट काढून
सर्कसला पुढच्या शीटवर बसले.सर्कस चालू
झाली,बाईसाहेबांनी डोळयावर गॉगल घातला होता. आणि तोच
प्रयोग सुरु झाला बाइने हत्ती उचलेला पाहून
साहेबांनी टाळी वाजवली.
अशा पध्दतीने खेळ पूर्ण झाल्यानंतर
साहेबांनी मॅनेजरची भेट घेतली व बाईसाहेबांचे अभिनंदन
करायच ठरवलं. मॅनेजर साहेबांना घेवून साहेबांकडे गेला परंतु
बाईसाहेबांनी डोळयावर गॉगल घातल्यामुळे
साहेबांनी तीला ओळखले नाही.साहेबांनी अभिनंदन केलं
असता बाईसाहेब नेहमीप्रमाणे म्हटल्या,त्यात काय अवघड
केलं म्हणजे होतं.हे ऐकल्याबरोबर साहेब म्हटले
आमची ही बी असंच म्हणायची आणि तेवढण्यात
बाईसाहेबांनी गॉगल काढला व म्हटले,अरे तु होय.मग
ही खरी वस्तुस्थिती एकमेकांना कळली व
दोघांनी एकमकांची माफी मागितली.
सिध्दांत - केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहीजे.प्रयत्नाने
अशक्य गोष्टी ही साध्य होता.म्हणून प्रयत्नच सर्वश्रेष्ठ
आहे.
प्रमाण - १} असाध्य ते साध्य करिता सायास । कारण
                  अभ्यास तुका म्हणे ॥

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०१४

अल्ला मेरी सुई सापडेगी तो मैं तेरेकु सव्वा मण का मलीदा खिलाऊँगी




एका स्त्रीची कपडे शिवण काम करण्याची वस्तू सूई शिवण
काम करता करता सुई हरवली.ती अल्लाला म्हणते,देख
अल्ला मेरी सुई सापडेगी तो मैं तेरेकु सव्वा मण
का मलीदा खिलाऊँगी.तीचा मुलगा अब्दुल्ला म्हणतो,मॉं पागल
हो गयी क्या। एक मण में कितनी सुई आयेगी,वो कहती है,देख
अब्दुल्ला मैं उसको थेडीच देनेवाली हूँ,मै तो उसको फसाती  हुं
म्हणजे देवाला फसवणारे सुध्दा काही कमी नाहीत.कौल
किया था उस मालिक से कभी न भुलुँगा तुझे.पण झालं काय।
गरभपनों में वचन दिया थां भजुंगा सीताराम बाहर आकर खुद
ही भुल गया खुद का आत्माराम ॥
नामदेव महाराज म्हणतात धरणी वायु लागता । समरण विसरे
तत्वता । ओळखु लागे माता-पिता । कोइं कोइं रडे ॥
त्या स्त्रीची सुई हरवली होती अंगणात व ती शोधीत
होती घरात.का तर म्हणे बाहेर उजेड आहे व आत अंधार
आहे.आत जरी अंधार असला तरी वसतु आतच आहे.कबीर
महाराज म्हणतात,मृग नाभी में कस्तूरी वसे मृग भटकत जंगल
जाय । बससे –हदय में राम बसत है पर मुर्ख न समझाए ॥
किंवा संत तुकाराम म्हणतात.
बोल अबोलणे बोल । जागे बाहेर आत निजेले । कैसे घरात घरकुल
केले ।
नेणो अंदार ना उजडले गां ॥ वासुदेव करिता फेरा । वाडीयात
बाहेर दारा ।

मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०१४

आयुष्यात भेडसावणार्या समस्यांच्या बाबतीत असच करायचं.

आपल्याला सर्वसामान्यपणे अस आढळून येत की अचानक संकट ओढवलं किंवा संकट ओढवणार आहे अशी भिती भेडसावत राहीली की काय करावं ते सुचत नाही.कशातच मन लागत नाही.
डोक्यात एकसारखे संकटाचेच विचार.चिंतेच्या ओशट पाकाने मन अगदी चिकट होवून जात, तरी पाक होईपर्यंत काळजी करत रहाणं आपण सोडत नाही.

संकटाची तीव्रता ही आपलं किती आणि कोणत नुकसान होणार यावर अवलंबून असते. आपापल्या वृत्तीनुसार आपण त्या त्या नुकसानाला महत्त्व देतो.

या नको त्या चिंता वहाण्यात एक नुकसान मात्र कायमचच होत रहात ते म्हणजे " आत्म्याचं उन्नयन, प्रगती " पण ते देहबुद्धीच्या हिशोबीच नसत, त्यामुळे त्याची कधी दखलच घेतली जात नाही.

जीवनातल्या इतर ज्या समस्या आहेत की ज्यामुळे आपण त्रस्त होवून जातो , त्यांनी मनस्वास्थ्य बिघडविण्याचं खरोखर कारण नाही.
समस्या कोणतीही असो, प्रत्येकीवर एक समान उपाय आहे तो म्हणजे . ....
सध्या ताबडतोब ती समस्या जशी आहे तशी स्वीकारणं .
घरातील कर्त्या व्यक्तीचा, जिवलगांचा मृत्यु, जन्मत: शारीरिक वैगुण्य घेवून जन्मलेलं मूल , आजार अपघातामुळे येवू घातलेलं कायमस्वरुपी अपंगत्व असे कितीतरी प्रसंग ते आपल्याशी अखेरपर्यंत जोडलेलेच रहाणार आहेत.ते प्रारब्ध म्हणून स्वीकारणं हेच श्रेयस्कर असत.

काही समस्या अशा आहेत की प्रयत्नांनी, युक्तीने त्या निघून जावू शकतात.आपसातल्या कुरबुरी, भांडण तंटे, आजार, नोकरीच्या ठिकाणी त्रास, धंद्यात अडचणी , आर्थिक बाबी, अशा ज्या गोष्टींची समस्या होते , त्यापाठची कारण शांतपणे पहाता येतात , त्यावर मार्ग काढता येतो.
परंतु ह्याप्रकारच्या समस्या आल्या की कोलमडून जाण्याच्या काही कारणात मुख्यत्वेकरुन पुढील कारण असतात.
मी हे कसं पेलणार , ह्या आत्मविश्वासाची कमी.पण लक्षात घेतल पाहिजे की
स्वत:वर विश्वास असेल तरच नशीब साथ देत.
दुसरं कारण म्हणजे आतापर्यंत लोकांपुढे सर्व छान दिसत होत , आता लोक काय म्हणतील ही अकारण वाजवीपेक्षा पोसलेली भेकड वृत्ती
आणखी कारण म्हणजे माझं सर्व नेहमी सुरळीतच चालावं अस एकसंधी आयुष्य हवं असण्याची दृढ मागणी .
अशा कारणांना धक्का लागला की आपण स्वत:ला सावरु शकत नाही.संकट आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठं भासत.

बौद्धिक चाचणी परिक्षेत एक प्रश्न देतात , तो असा की कागदावर एक रेषाखंड काढला जातो.जराही खाडाखोड न करता त्याची लांबी कमी करुन दाखवायची.
ह्याचं उत्तर म्हणजे त्याच्या बाजूला जास्त लांबीचा दुसरा रेषाखंड काढायचा.

आयुष्यात भेडसावणार्या समस्यांच्या बाबतीत असच करायचं.
समस्येपेक्षा मोठ्या दृष्टीकोनातून तिच्याकडे पहावं. काही न काहीतरी उत्तर सापडतच.
समजा आर्थिक समस्या आ वासून उभी आहे तर मग योग्य प्रकारे आवक होईल असे इतर पर्याय नक्कीच आहेत, ते निवडता येतात.
असे बदल करताना ते स्वीकारण्याची मनाची तयारी नसते, हा खरा प्रॉब्लेम असतो.
मुख्य समस्येतून बाहेर पडायचय तर सर्व आहे तस रहाव, ही चूकीची अपेक्षा आहे.
इतर गोष्टींशी तडजोड ही ओघानं येणारच.

मनाकडे प्रचंड उमेद आहे, उर्जा आहे.मनाने एकदा मनावर घेतलं तर अशक्य अस काहीच नाही.
मात्र मनाला ताळ्यावर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतातच.
" नामस्मरण " हा यासाठी हमखास उपाय आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यावर विचार न करत बसता " नाम " घ्यावं.
नामाकडे अचाट सामर्थ्य आहे.ते आपला प्रभाव दाखवणारच.

बुद्धीवर नामाचा प्रभाव होतो तेव्हा अशा विपरीत परिस्थितीत बुद्धी स्थिर ठेवण्याची , योग्य अयोग्याची निवड करण्याची क्षमता येते.
परिस्थितीवर मात करायची म्हणजे तत्व, मूल्य ह्यांच्याशी तडजोड करावी अस नाही.
हे धैर्य , सामोरं जायची निर्भयता " नामा " कडे आहे..
हे सुद्धा लक्षात घेवून स्वत:ला भाग्यवान समजावं की जेव्हा संकट येत तेव्हा माझ्या आराध्यावर माझी दृढ निष्ठा आहे की नाही हे सिद्ध होत.जेव्हा ते होकारार्थी येत तेव्हा अत्यानंदाने मन फुलून येत.
मग कोणती समस्या न कसलं काय !! अनुभवता येत ते फक्त सुख आणि सुखच !!! परमानंद !!

सोमवार, १७ नोव्हेंबर, २०१४

एकादशी

 एकादशी :



प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षांतील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधिली जाते. विष्णूची अत्यंत प्रिय तिथी, अशी तिची प्रसिध्दी आहे. वैष्णव, शैव, सौर आदी सर्व हिंदूंना व विशेषत: सर्व विष्णुभक्तांना एकादशी हे व्रत करावयास सांगितले आहे. नित्य व काम्य असे हे उभयविध व्रत आहे. व्रतविषयक सामान्य नियम यालाही लागू आहेत. एकादशीच्या बाबतीत ‘स्मार्त’ व ‘भागवत’ असे दोन संप्रदाय आहेत. ही तिथी दिनद्वयव्यापिनी असल्यास द्वादशीविद्धा वैष्णवांकरिता विहित आहे.
या संबंधीचे सूक्ष्म विवेचन निर्णयसिंधु त केलेले आहे. प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून २४ एकादश्या येतात. शुक्ल पक्षातील एकादश्यांची नावे : कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, पुत्रदा, जया व आमलकी.कृष्ण पक्षातील : वरूथिनी, अपरा,योगिनी,
कामिका, अजा, इंदिरा, रमा, उत्पत्ती, सफला, षट्तिला, विजया व पापमोचनी. अधिक मासातील दोन्ही एकादश्यांना कमला असे नाव आहे.
रात्रंदिवस उपवास व रात्री जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालविणे हा या दिवसाचा विशेष आहे. या दिवशी उपवास केला असता सर्व कामना परिपूर्ण होतात व वैष्णवपदही प्राप्त होते. आषाढ शु. एकादशीस
महाएकादशी किंवा शयनी एकादशी म्हणतात. या दिवशी विष्णू शयन करतात म्हणून शयनी असे नाव पडले. कार्तिक शु. एकादशीस विष्णू जागे होतात म्हणून प्रबोधिनी असे नाव पडले. आषाढी व कार्तिकी ह्या एकादश्यांना महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष शु. एकादशी हा दिवस ‘गीताजंयती’ म्हणून प्रसिध्द आहे. प्रदेशपरत्वे एकादशीव्रत आचरण्याचे प्रकार भिन्न भिन्न आढळतात.

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

लाल हिरे का गठरी बार बार मत खोल । जब आयेगा उसका पारखी तो वो ही करेगा मोल ॥ संत कबीर
























मेंढपाळाला सापडलेल्या हि-याचे मुल्य
एक धनगर आपल्या मेंढ्या पाळण्याचे काम करत
असता एक दिवस मेंढ्या घेऊन जात असताना एक
चकमणारी वस्तू त्याला दिसली ती त्यांने घेतली ती फार
आवडल्याने त्याने ती घेतली व कळपातील
आवडत्या मेंढीच्या गळ्यात बांधली.तो वारंवार त्या मेंढी व
त्या चमकणा-या वस्तूकडे पाहून खुश व्हायचा.पण तीचे
महत्व त्याला कळले नाही.एक दिवस रस्त्याने जाणा-
या व्यापा-याने त्या कळपातील मेंढीच्या गळ्यातील
चमकणारा हिरा पाहीला व मनात म्हणाला की, हया बिचा-
याला हयाची किंमत कळलेले दिसत नाही म्हणून त्याने
ती मेंढीच्या गळ्यात लटकवलेली दिसते.व्यापा-याने
मेंढपाळला भेटून ती मेंढी विकत घेण्याची विनंती केली.परंतु
त्या मेंढपाळाची ती मेंढी आवडती असल्याने त्याने
विकण्यास नकार केला.असे बराच वेळ व्यवहार
चालला,मेंढपाळ त्याची आवडती मेंढी असल्याने ती तो देणार
नाही हे लक्षात आल्यावर त्याने हि-याची विकत देण्याबाबत
विचारले;तेंव्हा मेंढपाळाला कळले की व्यापा-
याला ही चमकणारी वस्तू हवी आहे.या वस्तूचीही किंमत
निश्चीत फार असणार हे लक्षात आल्यावर तो व्यापा-
याला म्हणाला बोला तुम्ही किती किंमत देणार?धनगर
बिचारा साधा भोळा असल्याने त्याला त्याने बाजारात जावून
किंमत काढण्यास सांगीतले.त्याचे बाजारात जाऊन
त्या वस्तूची किंमत काढली तेंव्हा त्याला कोणी एक लाख
कोणी दीड लाख कोणी दोन लाख असे सांगीतले तेंव्हा ती वस्तू
सामान्य नसून तो हिरा आहे व त्याची किंमत लाखाच्या पटीत
असल्याचे त्याचे त्याला कळून आले.
सिध्दांत: धनगराला खरा हिरा सापडला परंतु त्याचे मुल्य
त्याला कळले नाही.हे जरी सत्य आहे.तसेच
आपणा सर्वांना जो नरदेह मिळाला त्याची किंमत कळते का?
तर नाही.तर नरदेहाचे महत्व संत सद्गुरु भेटल्यानंतरच कळेल.
प्रमाण - १} लाल हिरे का गठरी बार बार मत खोल । जब
आयेगा उसका पारखी तो वो ही करेगा मोल ॥ संत कबीर

गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४

!! बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!



जिथे चावला तिथे लाव




 जिथे चावला तिथे लाव
एक म्हातारी होती, तिला एक मुलगा होता व
तो थोडा भोळसट होता. तो मोठा झाल्यावर म्हातारीने त्याचे
लग्न केले. संसार करु लागले, शेतकरी कुटुंबातील असल्याने
असेच एक दिवस सासू त्या सुनेला आपली गाय गोठयात
बांधायला सागते. तेंव्हा ती सुन गाय बांधण्यासाठी गोठयात
खुंटीजवळ जाते. त्या खुंटीजवळ विंचू असल्याने
तो सुनेला चावला. ती मोठमोठयाने आरडाओरडा करुन सांगू
लागली मला विंचू चावला. तीचा मालक तातडीने डॉक्टरांकडे
जावून औषध घेऊन आला. डॉक्टरांनी सांगतल्या प्रमाणे जीथे
चावला तिथे औषध लावावयास सांगीतले असता ते दोघे
ज्या ठिकाणी विंचू होता त्या ठिकाणीते औषध लावू लागले.
सांगा पाव्हुन आता तीच्या वेदना केंव्हा कमी होतील । आपले
पण असेच चालले आहे.
सिध्दांत - वास्तविक साधुसंत सांगतात एक व
आम्ही समजतो भलतेच. साधू संताने बरोबर सांगितले आहे.
पण संताना जे सांगावयाच ते आम्हाला समजतच
नाही आणि म्हणून कदाचित साधन बरोबर असून
सुध्दा आम्हाला त्याचा फायदा होत नाही किवा साधन
मिळूनही अशा पध्दतीने ते वायाच जात आहे. म्हणून संताचे जे
मनोगत आहे ते बरोबर आत्मसात झाले पाहीजे त्यात
थोडी सुध्दा कमतरता उपयोगाची नाही. औषध मिळनही जर
वापर कळाला नाही तर औषध प्राप्त होऊन उपयोग नाही.
प्रमाण - १} तैसे तोंडी ब्रह्मनाम । हाती ते सात्वीक कर्म ।
विनियोगेविण काम । विफळ होय ॥ ज्ञानेश्वरी ॥

श्री क्षेत्र नारायण गडाचे दर्शन आता एका क्लिकवर.. शिवाजी महाराजांच्या हस्ते वेबसाईटचे उद्घाटन

श्री क्षेत्र नारायण गडाचे दर्शन आता एका क्लिकवर
  शिवाजी महाराजांच्या हस्ते वेबसाईटचे उद्घाटन
दि . १० नोव्हेंबर २०१४ - धाकटी पंढरी श्री क्षेत्र  नारायण गडाचा नावलौकिक महात्म्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता त्याची माहिती संपूर्ण जगामध्ये पोहचावी व नवतरुणांना गडाचा ऐतिहासिक वारसा व गडाची वाटचाल कळावी या उद्देशाने श्री क्षेत्र नारायण गडाची स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली असून या वेबसाईटचे  मान्यवराच्या उपस्थीतीमध्ये गडाचे मठाधिपती ह.भ.प श्री  शिवाजी महाराज यांच्या हस्ते आज गडावर उद्घाटन करण्यात आले आहे . श्री नारायणगडाला सुमारे तीनशे वर्षाचा ऐतिहासिक वारसा असून अध्यात्मिक व धार्मिक कार्य हाती घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर गडाने भगवी पताका मोठया तोऱ्यामध्ये मिरवली आहे. या गडाच्या विकास कामाला मठाधिपती श्री  शिवाजी महाराज, विश्वस्त मंडळ यांनी गेल्या तीन वर्षापासून मोठी चालना  दिली आहे. गेल्या तीन-साडेतीन वर्षाच्या वाटचालीमध्ये अनेक विकासकामे मोठया झपाटयाने होत असतांना पाहायला मिळत आहे म्हणूनच कि काय याची दखल घेत प्रसारमाध्यम ही गडाविषयी गुणगान गाऊ लागली आहेत. या गडाची महती आणि ऐतिहासिक वारसा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता त्याचा नावलौकिक अखंड जगतामध्ये व्हावा या उद्देशाने मुंबई येथील Blossom Infotech या  कंपनीने धाकटी पंढरी क्षेत्र नारायणगडाची स्वतंत्र वेबसाईट तयार केली असून www.narayangad.com या वरती एका क्लिकवर संपूर्ण नारायनगडाचे भाविक भक्ताचे  दर्शन करणे सोपे केले आहे. या संकेत स्थळाचे आज गडावर  मठाधिपती  महंत  ह.भ.प शिवाजी महाराज यांच्या हस्ते आज  उद्घाटन करण्यात आले आहे. या वेबसाईटचे निर्मितीसाठी Blossom Infotech या कंपनीचे मालक सुभाष काशिद व संतोष काशिद या  बंधूनी मोठी मेहनत घेवून  श्री क्षेत्र नारायणगडाची इत्यांभूत माहिती संकलीत करून वेबसाईट वर दिली आहे.  फोटोसाठी  उत्कर्ष गवते ,गवते सर , लोंढे सर  यांचे ही  सहकार्य लाभले आहे. या वेबसाईटवरून भाविक भक्ताना गडाची माहिती, गडाचा इतिहास , गडाचे एकून बांधकाम , आतापर्यंत होऊन गेलेल्या सर्व मठाधिपती ची माहित ,त्यांचे कार्य , गडावरील साजरे होणारे  उत्सव, दैनंदिनी , मुंबई किंवा पुण्याहुन गडावर कसे पोहचत येईल यासाठी रस्ता , रेल्वे , विमान मार्गाची माहिती  उपलब्ध केली आहे. या वेबसाईटचे उद्घाटन शिवाजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिव ऑड. महादेव तुपे, दिलीप गोरे, प्रा. जनार्धन शेळके, भीमराव मस्के आदी विश्वास्तंसह मधुकर महाराज गवारे, संभाजी महाराज मादळमोहिकर, इंजि, महेश साळुंके, लक्ष्मण महाराज ताकीक, रावसाहेब महाराज ढोणे, राजेंद्र महाराज गवते, नवनाथ काशीद आदींसह मोठया संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. दिलीप गोरे व इतर विस्वस्तानी आपल्या भाषणामध्ये  Blossom Infotech या कंपनीचे मालक संतोष काशिद यांचे आभार मानले . श्री संतोष काशिद यानी आपल्या भाषणात वेबसाईट बनवण्यसाठी सहकार्य केल्याबद्दल उत्कर्ष गवते, लोंढे सर , गवते सर ,संस्थानाचे विस्वस्त व मठाधिपती गुरुवर्य श्री शिवाजी महाराज यांचे आभार व्यक्त केले .

आमच्या प्रतिनिधीने श्री संतोष काशिद यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी त्याचे मुळगाव साक्षाळ पिपरी हे असून त्यांना या कामाची प्रेरणा वै. श्री महंत महादेव महाराज हे मुंबई येथे त्याचा घरी मुक्कामी असतानी मिळाल्याचे सांगितले.  नारायणगडा साठी  स्वतंत्र मोबाइल अप्स बनवणार असल्याचे मानोदय त्यांनी व्यक्त केला .               
 





नाम रुपा नाही मेळ । अवघा वाचेचा गोंधळ ॥

एक मतीमंद माणून फिरत फिरत एका गांवात
आला.त्याला आपण कोठे आहे,कोणत्या गांवात आहे हे
काहीही कळत नव्हते त्यामुळे तो त्या गांवातच फिरत
राहला.त्याला भूक लागली म्हणून
तो अन्नासाठी मागणी करता करता एका शेठजीच्या दारात
गेला व मला भूक लागली आहे जेवण द्या म्हणून
विनंती केली.ठीक आहे,त्याला शेठजीने जेवण दिले व येथेच
कामाला राहण्यास सांगीतले.तोही हो म्हणून
त्या ठिकाणी कामाला राहीला.
त्याला शेठजी घोडयाच्या तबेल्यामध्ये घेऊन गेला व
हया प्राण्यांची देखभाल करण्याचे काम
सोपवले.खरारा करणे,पाणी पाजणे,तबेला साफ
ठेवणे,इत्यादी कामे त्याला शेठजीने
सांगतली.त्या माणसाला शेठजीने
घोडयाला पाणी पाजण्यासाठी सोडून दिला.त्याला नदीवर
पाणी पाजून आणण्यास सांगीतले.तो घोडा घेऊन नदीवर
गेला,त्याला पाणी दाखवल पण तहान नसल्याने
तो काही पाणी पीत नव्हता. त्याला असे वाटले की तोंडातील
वस्तूमुळे तो पाणी पीत नसेल म्हणून त्यांने घोडयाचे तोंडातील
वस्तु काढली.इतक्यात त्याने धूम ठोकली पळू
लागला.घोडा पुढे माणूस मागे घोडा रेसचा असल्याने तो दुर
निघून गेला.त्याला त्या प्राण्याचे नांव माहीत नाही,ज्याचेकडे
काम करता होता त्या शेठजीचे नांव माहित नाही तसेच हातात
काय वस्तू आहे हेही काहीच माहित नसल्याने
तो घोडयाच्या तोंडातील वस्तु पुढे करुन समोरुन येणा-
या व्यक्तीला सांगू लागला की,अहो रांव तुम्ही,ज्यांच्याकडे
होतो आम्ही,त्यांना जाऊन सांगा तुम्ही (लगाम हातात धरुन)
हयाच्यातलं जे होत ते गेलं म्हणावं. मग
सांगा समोरच्या माणसाला काही समजेल कां.
सिध्दांत - तत्वत: देवाचे नांवही माहित
नाही आणि रुपही माहिती नाही असा जर परमार्थ करत असेल
तर त्याचा आयुष्यात मेळ केंव्हाच लागणार नाही.
प्रमाण - १}
नाम रुपा नाही मेळ । अवघा वाचेचा गोंधळ ॥
............. तुकाराम महाराज


मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०१४

www.narayangad.com या संकेतस्थळाचे उद्घाटन महंत गुरुवर्य श्री शिवाजी महाराज यांच्या हस्ते झाले

संकष्टी चतुर्थी च्या (दि . १० नोव्हेंबर २०१४) शुभ दिवशी श्री क्षेत्र नारायणगड  येथे www.narayangad.com  या संकेतस्थळाचे उद्घाटन महंत गुरुवर्य श्री ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्या हस्ते झाले यावेळी नारायण गडाचे विश्वस्थ दिलीपअण्णा  गोरे , महादेव तुपे ,जनार्धन शेळके , भीमराव मस्के ,  श्री ह.भ.प. संभाजी महाराज , उत्कर्ष गवते  आणि संतोष काशिद Blossom  Infotech चे मालक आदीची उपस्थिती हो
ती .

पहारा चालु आहे

पहारा चालु आहे
एका नगरातील राजा व त्याची राणी दोघेही फार धार्मीक
वृतीचे होते.राणीला देवीच्या पुजेसाठी दररोज फुले
लागत,कधी कधी फुले न मिळाल्याने तीची पुजा परिपुर्ण होत
नसे व तीला उपवास घडत असे.त्यामुळे तीने फुलांची बाग
तयार करुन रक्षणासाठी दोन
पहारेकरी ठेवले.तीचा पुजेचा नित्यक्रम सुरु
झाला.काही काळानंतर मुलाचे ताब्यात राज्य कारभार
दिला राजा व राणी तीर्थयात्रेला गेले व .दुदैवाने
राजाराणी परत केंव्हाच आली नाही.असा बराच काळ गेला व
राज्यात दुष्काळाचे सावट आले.त्यामुळे तिजोरीवर आर्थीक
ताण वाढू लागला.खर्चात कपात करण्यात
आली.प्रधानाला प्रत्येक खात्याबाबत अनावश्यक खर्च
कोठे कोठे आहे याची चौकशी करण्याचे आदेश
दिले.चौकशीअंती दोन पहारेकरी मोकळया जागेवर
पहारा करताना आढळले.त्या पहारेक-
याच्यांबाबातचा अहवाल राजाकडे आला तो अहवाल
तपासला व प्रत्यक्ष चौकशी केली तर
ज्या ठिकाणी पहारा होता त्या ठिकाणी राणीने पुजेला फुले
उपलब्ध व्हावीत म्हणून फुलांची बाग लावली. त्या बागेत
फुलांची वेल होती ती पहारेक-यांच्या पायात अडकत
असल्याने ती वेल त्यांनी उपटून टाकली व बागही नष्ट झाली,
मात्र पहारा सुरुच होता.
सिध्दांत - आताच्या परिस्थितीत परमार्थ जोरात चालू असून
आळंदी पंढरपूरच्या वा-या, तीर्थयात्रा, वृतवैकल्य, होम
हवन,पूजापाठइत्यादी धार्मीक कर्मे जोरात सुरु आहेत. मात्र
करण्याचे वर्म माहित नसल्याने त्यातील अनुभव येत
नाही.ज्ञानोबा तुकोबांनी लावलेला भक्तीमार्गाचा वेल आज
योग्य पध्दतीने जोपासला न जाता तो उपटून टाकण्याचेच
काम सुरु आहे.इतर साधने कशासाठी याचे वर्म समजावून घेणे
अत्यंत आवश्यक आहे.
प्रमाण - १} अर्थ लोपले पुराणे । नाश केला शब्द ज्ञाने ।
विषय लोभी मने । साधन अवघी बुडवली ॥ संत तुकाराम
महाराज

रविवार, ९ नोव्हेंबर, २०१४

बिया फेकणारा माणूस ........


बिया फेकणारा माणूस
------------------
गोष्ट आहे सीताफळांच्या बिया साठवणाऱ्या एका वयस्कर माणसाची. अकलूज गावचा हा माणूस गेली ३० ते३५ वर्षे सीताफळांच्या बिया साठवतो. मुंबईला, पुण्याला कामानिमित्त जावं लागतं. तो पिशवी भरून त्याघेतो आणि जाताना घाटात गाडी थांबते तिथं तिथं दरीत फेकून देतो. हल्ली त्या घाटावर पाट्यांमध्ये पिकलेली सीताफळं घेऊन अनेकजण विक्रीला बसलेले असतात . अलीकडे या माणसानं खास त्यांच्याकडे जाऊन विचारलं , ' कुठून आणता ही सीताफळं ?' ' तुमचे मळे आहेत का ?' ' कुठले मळे साहेब ? आम्ही गरीब माणसं . लोक घाटात शेकड्यानं बिया टाकतात . झाडं उगवलीत दरीत . सारं फुकटच . आम्ही फळं गोळा करतो . पिकवतो आणि तुम्हाला विकतो . शेकडो गरीब कुटुंब चालतात यावर इकडची .' त्या विक्रेत्याकडं गहिवरल्या डोळ्यानं पहात हीव्यक्ती डझनभर सीताफळं विकत घेते . पुन्हा बिया गोळा करून घाटात फेकण्यासाठी ! बारमाही काम करतायेईल असा हा देश . बिया फेकल्या तरी अमृतासमान चव असणारी फळे पिकवणारी इथली माती . बिया साठवूनएखादा जरी घाटावरून त्या दरीमध्ये फेकणारा भेटला तरी हजारो कुटुंबांची तो सोय करून जातो .
वर वर किरकोळ वाटली तरी ही घटना अंतर्मुख करते . ही दृष्टी किती लोकांची असते ? जर प्रत्येकानं असा एखादा छंद बाळगला तर काळ बदलून जाईल . अशा माणसांना काय व्यक्तिगत दुःख असत नाही , असं नाही . तोही पिंजून गेलेला असतो . पण अशा प्रेरणा तो दाबत नाही . तो त्या कृतीत आणतो .आपल्याला आपलं अंतर्मन कित्येकदा एखादं सत्कृत्य करायला सांगत असतं ; पण कितीवेळा आपण ते करतो ?एखाद्या आंधळ्या भिकाऱ्याला काही तरी दान करावं म्हणून खिशात गेलेला हात कित्येकदा तसाच बाहेर येतो .
सरहद्दीवर विनाकारण गोळीबार करणारे शेजारी देश शहरा - शहरात स्फोट घडविणारे अतिरेकी , देशात राहूनदेशद्रोह करणारे काहीजण आणि अशा अनेक उलट्या काळजाच्या व्यक्तींच्या समूहामध्ये उद्विग्न झालेले आपणसारे . आपल्याला बिया फेकणारी अशी एखादी व्यक्ती भेटली , तर शहारून जातो आपण . मनाला कुणीतरी गारफुंकर मारून सुखावतंय असं वाटतं .
जंगलाची तोड होते . रस्त्यासाठी , इमारतीसाठी झाडांची तोड होते . तितक्या प्रमाणात ती पुन्हा लावली जातातका ? तोडलेल्या झाडांवरच्या पक्ष्यांचं पुढं काय होतं ? याचाही विचार नको का करायला ? झाडांशिवाय आणिपक्ष्यांशिवाय असलेलं गाव ते गाव कसलं ? ग्लोबल वॉर्मिंगच्या जागतिक परिषदा होत राहतात . मीडियातूनत्यांचा उदो उदो होतो . त्यातून साध्य काय होतं ? झाडं लावणारे , ती जगवणारे , पक्ष्यांना दाणे टाकणारे ,झाडांवरच्या घरट्यांकडं भरल्या डोळ्यांनी बघणारे आणि सीताफळांच्या बिया फेकणारे शेवटी पडद्याआडचराहतात .

सबसे बडा कौन ??



सबसे बडा कौन  ??
एक साधू रस्त्याने जात होता त्याच रस्त्याच्या कडेला एक
शेतकरी पृथ्वी मातेची पूजा करता होता.तेव्हा त्या साधूने
शेतक-याला विचारले क्या कर रहे हो।
तेव्हा तो शेतकरी सांगतो,धरती मॉं की पूजा करता हुं,क्यों कि ये
सबको अनाज देती हैं। ये सबसे बडी हैं इसलिए मैं
इसकी पूजा करता हुं। तेव्हा तो साधू
म्हणतो,पृथ्वी कायकी बडी वो तो शेष माथे पे खडी
तो बोले,हम शेष की पूजा करेंगे शेष काय
का बडा वो तो शंकरजी के गले में पडा। तो बोले हम भगवान
शंकरजी की पूजा करेंगे।शंकर काय का बडा वो तो नंदी के उपर
बैठा।तो हम नंदी की पूजा करेंगे.नंदी काय का बडा नंदी काय
का बडा वो तो कैलास पर्वतपर खडा फिर हम कैलास पर्वत
की पुजा करेंगे। कैलाश कायका बडा कैलाश
कायका बडा वो तो रावण ने तीन बार उखाडा तो बोले हम
रावण की पूजा करेंगे। रावण कायका बडा रावण काय
का बडा वो तो वाली के बगल में का किडा तो हम
वाली की पुजा करेंगे वाली कायका बडा वाली काय का बडा
उसको राम ने एक बाण से उखाडा तो हम
रामजी की पुजा करेंगे राम कायका बडा राम
कायका बडा वो तो वसिष्ठजी के चरणो में पडा।
तात्पर्य - सदगुरु शिवाय तरणोपाय नाही.सद्गुरु हेच सर्वातश्रेष्ठ आहेत.

प्रमाण - } सकळ देवांचे दैवत सद्गुरुनाथ एकला
      } राम केला ब्रम्हज्ञानी ।वसिष्ठ मुनी तारक तुकाराम महाराज