शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

श्री क्षेत्र नारायणगड सेवाभावी संस्थेच्या वतीने मीरा भाईंदर (मुंबई ) शहरात भव्य अखंड हरीनाम साप्ताह चे आयोजन

बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगड सेवाभावी संस्थेच्या वतीने मीरा भाईंदर (मुंबई ) शहरात भव्य अखंड हरीनाम साप्ताह चे आयोजन १२/११/१५ ते १९/११/१५ या कालावधीत केले आहे तरी सर्व भक्तांना आग्रहाचे निमंत्रण आहे . विशेष म्हणजे मंडळाचे हे १२ वे वर्ष असल्याने  तपपुर्ती सोहळा साजरा होणार आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व भाविकांना विनंती आहे कि सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. कार्यक्रमाला येण्यासाठी पत्ता किंवा रस्ता संदर्भात  मदत हवी असल्यास ९३२०००३४९१ या मोबाईल वर संपर्क करावा .


बुधवार, २८ ऑक्टोबर, २०१५

पाण्यात आणि मनात काय साम्य ?

पाण्यात आणि मनात काय साम्य ?

दोन्ही जर गढूळ असतील तर..
अत्यंत धोकादायक
दोघही आयुष्य संपवू शकतात.
दोन्ही जर उथळ असतील तर
खळखळाटच फार...
पाय घसरण्याची शक्यता अधिक.

दोन्ही स्वछ असतील तर जिथे
जातील तिथे आनंदवनच फुलवतात.
पाण्यात आणि मनात मुख्य फरक काय ?
पाण्याला बांध घातला तर पाणी "संथ" होते अन...
मनाला बांध घातला तर माणुस "संत" होतो ...!!...💐💐