बुधवार, ४ एप्रिल, २०१८

आज गडाच्या सौंदाना येथील ६६ वा नारळी अखंड हरिनाम सप्ताहची जिल्ह्यातील जवळपास सर्वच वृत्तपत्रांनी दखल घेतली


श्री क्षेञ नारायणगड संस्थानचा नारळी अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे  वारकरी सांप्रदायाचा कुंभमेळाच आहे.अध्यात्मात गड ही संकल्पना पहिल्यांदा नारायणगडाने आणली म्हणून नारायणगड हा गडांची माऊली आहे. मराठवाड्यातील ८०% कीर्तनकार नारायगडाने दिले. आज गडाच्या सौंदाना येथील ६६ वा नारळी अखंड हरिनाम सप्ताहची जिल्ह्यातील जवळपास सर्वच वृत्तपत्रांनी दखल घेतली श्री क्षेत्र नारायणगड संस्थानच्या वतीने सर्वांचे जाहीर आभार .
गडाच्या अधिकृत माहितीसाठी व जास्तीतजास्त प्रसार व्हावा यासाठी खालील लिंक ला भेटद्या व share करा 









रामराव ढोक महाराज यांनी सौंदाना येथील अखंड हरिनाम नारळी सप्ताहातील कीर्तन

रामराव ढोक महाराज यांनी सौंदाना येथील अखंड हरिनाम नारळी सप्ताहातील कीर्तनात आई-वडील यांना सांभाळा, चोरी करू नका, खोटे बोलू नका, व्यवसाय करा, निर्व्यसनी जीवन जगा, वृक्षारोपण करा, मुलींच्या जन्माचे स्वागत करा आणि जेवताना शेतकऱ्यांना आणि झोपतांना लष्करांना विसरू नका असे मौलिक संदेश दिले. या कीर्तनप्रसंगी जिल्ह्यातून हजारो भाविक उपस्थित होते.


मंगळवार, ४ एप्रिल, २०१७

श्री क्षेत्र नारायणगडाच्या सर्वांगीण विकासासाठी २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली

 श्री क्षेत्र नारायणगडाच्या सर्वांगीण विकासासाठी २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली

श्री क्षेत्र नारायणगडाच्या सर्वांगीण विकासासाठी आज मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात पालकमंत्री, विश्वस्त, महंत व आ. मेटेंच्या उपस्तिथीमध्ये महत्वपूर्ण बैठक होत नारायणगडासाठी तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे .
श्र क्षेत्र नारायणगड च्या 400 एकर वरील प्रस्तावित आराखड्यात कायमस्वरूपी पाणी पुरवठा व्यवस्था, सुलभ शौचालय, सुसज्ज असे वाहनतळ व बस स्थानक, भक्त निवास, सौरऊर्जा यंत्रणा, सांस्कृतिक सभागृह, प्रसादालय, गोशाळा आदी बाबींचा जाणीवपूर्वक समावेश केला आहे.
          गडाची नैसर्गिक शोभा वाढविण्यासाठी वन विभागा मार्फत साधारणपणे 2 कोटी रुपये वन उद्यान उभारण्यात येणार असून, गडावरील घन कचरा आणि पाणी निचरा व्यवस्थापनाचे काम हाती घेण्यात येणार असून त्याच बरोबर जलसंधारण विभागा मार्फत पाणी अडविण्यासाठीचे काम केले जाणार आहे.या निधीमधून नारायणगड संस्थानचा सर्वांगीण विकास करण्यात येणार असून या महत्वपूर्ण बैठकीस कलेक्टर व सी.ओ हेही उपस्थित होते 
.

शुक्रवार, १८ मार्च, २०१६

महाराष्ट्रातील तमाम भाविकांना विनंती आहे कि धाकट्या पंढरीच्या या भव्य दिव्य सोहळ्यासाठी प्रचंड संखेने उपस्थित रहावे



गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५


श्री क्षेत्र नगद नारायण गड सेवाभावी संस्था व काशिमिरा ग्रामस्थ (मुंबई )आयोजीत अखंड हरीनाम साप्ताहाला काल पासून सुरुवात झाली मुंबई तील मराठवाडा परिसरातील व गावाकडील सर्व भाविकांना विनंती आहे कि त्यांनी एक दिवस तरी सप्ताहा ला उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.




श्री क्षेत्र नगद नारायण गड सेवाभावी संस्था व काशिमिरा ग्रामस्थ आयोजीत अखंड हरीनाम साप्ताह ची काल सुंदर सुरुवात झाली पाहिल्या दिवशी जेष्ठ पत्रकार ,संवेनदशील कवी , साहित्यिक ,विचारवंत तथा कीर्तनकार व महाराष्ट्र अत्यंत गाजलेल्या "अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात आडलं" या कवितेचे लेखक बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज यांनी त्याचे सहकारी व दैनिक पुढारी चे राजकीय उपसंपादक , प्रशिद्ध उद्योजक घुले साहेब व सोनावणे साहेब यांनी आज भेट दिली . मंडळाच्या वतीने त्याचे स्वागत करण्यात आले. शामसुंदर सोन्नर महाराजांनी मंडळाला त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संच भेट दिल्याबद्दल नारायणगड सेवा भावी संस्था आभारी आहे.

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

श्री क्षेत्र नारायणगड सेवाभावी संस्थेच्या वतीने मीरा भाईंदर (मुंबई ) शहरात भव्य अखंड हरीनाम साप्ताह चे आयोजन

बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगड सेवाभावी संस्थेच्या वतीने मीरा भाईंदर (मुंबई ) शहरात भव्य अखंड हरीनाम साप्ताह चे आयोजन १२/११/१५ ते १९/११/१५ या कालावधीत केले आहे तरी सर्व भक्तांना आग्रहाचे निमंत्रण आहे . विशेष म्हणजे मंडळाचे हे १२ वे वर्ष असल्याने  तपपुर्ती सोहळा साजरा होणार आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व भाविकांना विनंती आहे कि सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. कार्यक्रमाला येण्यासाठी पत्ता किंवा रस्ता संदर्भात  मदत हवी असल्यास ९३२०००३४९१ या मोबाईल वर संपर्क करावा .


बुधवार, २८ ऑक्टोबर, २०१५

पाण्यात आणि मनात काय साम्य ?

पाण्यात आणि मनात काय साम्य ?

दोन्ही जर गढूळ असतील तर..
अत्यंत धोकादायक
दोघही आयुष्य संपवू शकतात.
दोन्ही जर उथळ असतील तर
खळखळाटच फार...
पाय घसरण्याची शक्यता अधिक.

दोन्ही स्वछ असतील तर जिथे
जातील तिथे आनंदवनच फुलवतात.
पाण्यात आणि मनात मुख्य फरक काय ?
पाण्याला बांध घातला तर पाणी "संथ" होते अन...
मनाला बांध घातला तर माणुस "संत" होतो ...!!...💐💐

शुक्रवार, २६ जून, २०१५

क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो.

एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच
न कळाल्याने रस्ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता न मागे येण्याचा.तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे. तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले. पहिली पाळी सात्यकीची होती.सात्यकी पहारा करू लागला
तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू लागले. पिशाच्चाने बोलावलेले पाहून सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे.
एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले. सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती.
पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद
त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले. सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले, "तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो. मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे. ’’

तात्पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो.
क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते, नष्ट करता येते.
👉क्रोधाचे हे पिशाच्च बाहेर कोठे नसून, आपल्या विचारातच वसत असते.

मंगळवार, ५ मे, २०१५

संकटांपासून कधीच पळून चालणार नाही.

संकटांपासून कधीच पळून चालणार नाही.

कदा एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्त पडत असे तर कधी पूर्ण दुष्काळ, कधी ऊन जास्त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे. 

एक दिवस वैतागून त्याने देवाला साद घातली व देवास सांगितले,''तुम्ही सर्वव्यापी प्रभू परमेश्वर असाल इतर सर्व गोष्टीतले तुम्हाला कळत असेल पण माझ्या मते तरी तुम्हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्हाला मी करतो की तुम्ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्यात द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्यांच्या राशी कशा घालतो ते पहाच तुम्ही.''

देव हसला आणि म्हणाला,''तथास्तू, तुझ्या म्हणण्याप्रमाणे आज, आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला. 

शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्यासाठी गहू पेरले, जेव्हा त्याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्हा त्याने ऊन पाडले, जेव्हा त्याला पाणी द्यायचे होते तेव्हा त्याने पावसाचा वर्षाव केला. प्रचंड ऊन, गारा, पूर, सोसाट्याचा वारा याचा स्पर्शही कधी त्याने आपल्या पीकांना होऊ दिला नाही. काळ निघून गेला आणि त्याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्हे इतके पीक आले होते.

शेतक-याने मनातल्या मनात विचार केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते तो वरून पाहत असतो. पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला. पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्हाच्या त्या ओंब्यांमध्ये एकही दाणा नव्हताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्हाचा दाणा भरला गेला नव्हता.

थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय मोकलून रडू लागला. त्याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्हणाला,'' अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्छेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्हणून पीक तसे येत नसते. त्या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्या वा-यातच पिक उभे राहते तेव्हाच त्याच्यात बळ येते. प्रचंड उन्हातही त्याच्यात जगण्याची इच्छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्याला त्याची कुवत कळत नाही."

" सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्याच गोष्टीची किंमत राहत नाही. आव्हान मिळाले नाही म्हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्हाच त्या पिकात जगण्याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्याचा प्रयत्न करते. तू हे कधीच होऊ दिले नाही म्हणून तुझे पीक हे पोकळ निघाले. सोन्याला सुद्धा चकाकी येण्यासाठी आधी आगीतून जावे लागते तेव्हाच ते चकाकते. हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्हाच सोन्याचा उत्कृष्ट दागिना बनतो.'' आता शेतक-याला जीवनाचे सार उमगले होते.

कथासार - जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्हाने नसतील तर मनुष्य अगदी खिळखिळा बनून राहतो. त्याच्यात कोणतेच गुण येऊ शकत नाहीत. संकटाकडूनच माणूस शिकतो. 

जीवनात जर कधी यशस्वी व्हायचे असेल तर संकटांपासून कधीच पळून चालणार नाही. संघर्ष केल्यानेच संकटे दूर होतात त्याच्यापासून दूर पळून नाहीत.

Sources : कुठेतरी छानसे वाचलेले.


मंगळवार, २८ एप्रिल, २०१५

क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो.

क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो.

एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्याने रस्ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता न मागे येण्याचा. तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे. तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले. पहिली पाळी सात्यकीची होती.
सात्यकी पहारा करू लागला तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू लागले. पिशाच्चाने बोलावलेले पाहून सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे.
एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले. सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती.
पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले.
सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले, "तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो. मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.’’
Sources : WhatsApp

शुक्रवार, २४ एप्रिल, २०१५

प्रारब्धाचा हिशेब

प्रारब्धाचा हिशेब  :

एक दिवस एक माणूस पूर्व सुचना देता कामावर गेला नाही .
मालकाला वाटलं ह्याचा जर पगार वाढवला तर हा काम मन लावून करेल .....
म्हणून पुढच्या वेळेस मालकाने पगारा व्यतिरीक्त त्याला पैसे वाढीव दिले ......
तो काही बोलला नाही , त्याने चुपचाप मिळालेले पैसे ठेवून दिले .......
काही महिन्यानंतर परत तसच घडलं .... तो पुर्वसुचना देता गैरहजर राहीला ...
मालकाला त्याचा खूप राग आला आणि त्याने विचार केला कि, याचा पगार वाढवून काय फायदा झाला ???
हा काही सुधारणार नाही .....
पुढच्या वेळेस मालकाने त्याला वाढवलेला पगार कमी करून त्याच्या हाती पगार दिला .....
त्याने कुठलीही तक्रार करता चुपचाप पगार घेतला .....
मालकाला खूप आश्चर्य वाटलं .
अखेर राहवून त्याने त्याला विचारलं , '' मागच्या वेळेस तू गैरहजर राहीलास तरी तुझा पगार वाढवला ....तेंव्हा सुद्धा तू काही बोलला नाहीस , आणि ह्या वेळेस सुद्धा तू पूर्वसुचना गैरहजर राहीलास म्हणून तुझा वाढवलेला पगार कापला ....
तरीही तू काही बोलत नाही असं का ?????
त्यावर त्याने दिलेलं उत्तर विचार मनाला भिडणारं होतं ..
''तो म्हणला , मालक पहिल्या वेळी मी गैरहजर राहीलो त्यावेळी मला मुलगा झाला होता ...... तुम्ही माझा पगार वाढवलात तेंव्हा मी विचार केला , देवाने माझ्या मुलाचा पालनपोषणाचा हिस्सा पाठवला .......
दुस-यांदा जेंव्हा मी गैरहजर राहिलो तेंव्हा माझ्या आईचं निधन झाले होते आणि तुम्ही माझा वाढवलेला पगार कापलात ......
मी मनाशी विचार केला माझी आई तिचा वाटा तिच्या बरोबर घेऊन गेली .
मग मी ह्या पगाराबद्दल चिंता का करू ??
ज्याची जबाबदारी खुद्द देवाने घेतली आहे ........

तात्पर्य -

जिवनांत काय मिळवलसं आणि काय गमावलसं असं जर कुणा विचारलं तर ,
''खूप सुंदर नाते आहे माझ्यात देवामध्ये ....''
''जास्त मी मागत नाही आणि कमी देव देत नाही .......

बेलाशक सांगा , जे गमावलं तो माझा अविचार होता आणि जे कमावलं ती देवाची कृपा होती.


बुधवार, २२ एप्रिल, २०१५

|| एक दिवसाचा पांडुरंग ||

|| एक दिवसाचा पांडुरंग ||

पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता,
तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि,विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील..!
म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले,
देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस,
तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे,
मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन"
त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे ,
पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस,
काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा रहा.
पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला.
तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले,
श्रीमंत भक्त :- "देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊं दे"
(त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तेथेच विसरला, पण देवाने काहीच करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला.
पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले.
गरीब भक्त:- "पांडुरंगा, हा एक रुपया मी तुला अर्पण करतो, माझी हि धनाची सेवा स्वीकार कर. तसेच
मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे...!
देवा माझी बायको मुले दिवसांपासून उपाशी आहेत,घरात अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छे प्रमाणे होईल, असा मला विश्वास आहे.
असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते, तेव्हा देवाचे आभार माणून तो ते पाकीट घेऊन जातो आपल्या उपाशी बायकोला, मुलांना इतर गरीब लोकांना अन्न देतो.
गोकुळ काहीच बोलता हसत उभाच असतो.
पुढे तिथे एक नावाडी येतो, देवाला उद्देशून तो म्हणतो, हे पांडुरंगा, आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे..!
असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात
तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो.
तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू
शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो.
तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, " पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस, मी काहीच नाही केले तरी मला हि शिक्षा...?
हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते, तो विचार करतो कि स्वत:हा पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने
काहीतरी केले असते,
असे म्हणून राहवून तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे" ..... !
त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात, तेव्हा नावाडी श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.
रात्री पांडुरंग मंदिरात येतो गोकुळाला विचारतो कसा होता दिवस....?
गोकुळ म्हणतो ,पांडुरंगा मला वाटले होते, कि इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले कि हे काम किती अवघड आहे ते...!
ह्यावरून कळते कि तुझे दिवस हे सोपे नसतात..!
पण देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो.
तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, " शेवटी तू
माझ्या आज्ञेचा भंग केलास, तुला मी सांगितले होते कि तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर) विश्वासच नाही.!
तुला काय वाटते कि मी भक्तांच्या ह्रुदयातील भावना ओळखू शकत नाही..?
गोकुळ मान खाली घालून उभा राहतो..!
पांडुरंग पुढे म्हणतो,
अरे, त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे
चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते,
आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसाया मध्ये
माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट
हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील
पापाचा साठा कमी होणार होता.
आणि त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकीट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे.
त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता, तेथील वातावरण आज खूप खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत,
ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक
करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील मोठ्या संकटापासून सुटेल.
पण तुला वाटले कि आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेसआणि नेहमी जे होते तेच आजपण झालेदेव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो,
पण मनुष्यच त्यावर पाणी सोडतो.....!
तात्पर्य :- देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे, फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे..!


                                                      ||  श्री हरी विठ्ठल विठ्ठल  ||