शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

माघार घेऊ नकोस …

माघार घेऊ नकोस …
जेव्हा तुला अनंत अडचणी येतील
जेव्हा तुझा मार्ग अत्यंत खडतर असेल
जेव्हा तुझ्या अपेक्षा जास्त असतील 
व तुला पाहिजे तसे यश मिळत नसेल
जेव्हा तुला हसायचे असेल, परंतु रडावे लागत असेल
जेव्हा तुला चिंतेने ग्रासलेले असेल …
तेव्हा तू थोडा विसावा घे, पण माघार घेऊ नकोस.
जीवन चढ उतारांनी भरलेले आहे.
जेव्हा तू काही मिळविण्यासाठी परिश्रम करत असशील
तेव्हा कधी कधी अपयशही येईल .
पण तू प्रयत्न करणे सोडलेच नाहीस तर तुझा विजय निश्चित आहे.
आता जरी तुला तुझी प्रगती कमी वाटली तरी,
तू पुढच्याच प्रयत्नात यशस्वी होऊ शकतोस
अपयश ही यशाची दुसरी बाजू आहे.
जेव्हा मनातल्या बऱ्याचशा शंकामुळे आपल्याला
यशाची शक्यता कमी दिसते …
तेव्हा, यशापासून आपण नेमके किती दूर आहोत,
हे आपण खरेच सांगू शकत नाही.
यश खूप दूर आहे असे जेव्हा आपल्याला वाटते
तेव्हा ते खूप जवळही असू शकते .
जेव्हा तू प्रतिकूल परिस्थितीशी झगडत असशील
तेव्हा, खरेच प्रयत्न करणे मात्र सोडू नकोस
प्रयत्नांनी तुला थकवा येईल
तेव्हा थोडा विसावा घे, पण माघार घेऊ नकोस
अजिबातच माघार घेऊ नकोस …
येणाऱ्या सर्व आव्हानांसाठी सज्ज रहा
त्यांना खंबीर मानाने सामोरे जा.
(Sources : कुठेतरी छानसे वाचलेले.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा