शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

शुध्द अंत:करणात सकस विचार निर्माण होतात.

शुध्द अंत:करणात सकस विचार निर्माण होतात.
एका राजाजवळ खादाड बकरा होता. राजाने दवंडी दिली, बकऱ्याला जंगलात चरायला नेऊन तृप्त करून आणेल, त्याला अर्धे राज्य बक्षीस. पण बकरा तृप्त झाल्याची परीक्षा मी घेईल. काम खूप सोपे वाटून एकजण धावत राजाकडे आला. बकरा घेऊन जंगलात गेला. दिवसभर कोवळे हिरवेगार गवत चरायला दिले. संध्याकाळी त्याला वाटले, दिवसभर बकरा चरतोय, नक्कीच त्याचे पोट भरले असणार. बकऱ्याला घेऊन राजाकडे आला. राजाने हिरवे गवत टाकल्याबरोबर बकरा खाऊ लागला. राजा म्हणाला, याला पोटभर खाऊघातले नाहीस. अन्यथा त्याने गवत खाल्ले नसते.
नंतरही पुष्कळ लोकांनी प्रयत्न केले. एका सुविचारी माणसाला वाटले, राजाच्या दवंडीत रहस्य आहे. काम युक्तीने केले पाहिजे. त्याने बकरा जंगलात नेला. बकऱ्याने गवत खायला सुरूवात केली की, तो बकऱ्याला काठीने मारीत असे. दिवसभर असे घडल्याने बकऱ्याची मानसिकता अशी झाली की, गवताला तोंड लावले की मार मिळतो. संध्याकाळी सुविचारी मनुष्य बकऱ्यासह दरबारात आला. राजाने गवत टाकले. बकरा त्याकडे पहायला तयार होईना. कारण गवत खाल्ले की मार बसण्याची भीती!
आपले मनही असेच आहे, तृप्त न होणारे. त्याचे विवेकाने ताडन केले तरच ते ताब्यात राहील. अन्यथा, अहंकाराचा चारा त्याला पुष्ट करील. अहंकार दूर झाला की अंत:करण शुद्ध होते. शुध्द अंत:करणात सकस विचार निर्माण होतात. विश्वाला प्रगतीच्या दिशेने नेतात....!!!
Sources : WhatsApp

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा